असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व जणू लोकनायक परिवारातील भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या सर्वांनाच कार्यरत असतांना कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:-...
सुधरत नाही माणसे काय करावे बघ? Marathi poem no 8
- Get link
- X
- Other Apps
सुधरत नाही माणसे काय करावे बघ?
सुधरत नाही माणसे काय करावे बघ?
खुद्द परमेश्वरलाही यक्ष प्रश्न पडावा
कशी घडवली मी ती माणसे बघ..
येत नाही अंदाज त्यांचा दिसण्यावरूनही
दुटप्पी कशी वागतात ही माणसे बघ
मुखवट्यावरती चढवती मुखवटे
खरा चेहरा कुठे हरवला हे नकळती त्यांसी बघ
सुधरत नाही माणसे बघ..
ईश्वराने बनविले माणसाला माणूस बघ
पण ती शेवटी जनावरे झाली बघ
सुधरत नाही माणसे बघ...
दिवसा मागे जाती दिवस
काळ्याचे होते पांढरे बघ
पण ना तरीही सुधरती माणसे बघ
अवगुणांना जणू परमेश्वर मानती ते बघ
मग कशी सुधरणार ती माणसे बघ
पण शेवटी प्रश्न तसाची राहतो
सुधरत नाही माणसे काय करावे बघ?
कवी:- सुमित अतकुलवार
- Get link
- X
- Other Apps
Comments
Popular posts from this blog
अंक चार (मराठी कविता नंबर ९)..
अंक चार तुमचे पद चार दिवसाचे तुमची प्रतिष्ठा चार दिवसांची तुमच्या गर्वाचे आयुष्यही चारच दिवसांचे तुमची अमीरी चार दिवसांची तुमची जिंदगी चार दिवसांचीच तुमचा मृत्यू चार खांद्यांचा तुमची मालकी चार गज जमीनी पुरतीच तुमचे जीवनाचे टप्पेही चारच सासुरवास ही चारच दिवसांचा तुमच्या मुख्य दिशाही चारच तुमच्या दिवसाचे प्रहर ही चार तुम्ही जगतानाही वावरता ते चार चौघातच.. तुम्हाला पडलेला नेहमीचाच प्रश्न चार लोक काय म्हणतील? आणि शेवटी सर्वात महत्वाचे मानवी पुरुषार्थ ही चारच.. अन् म्हणूनच मनुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारा ही अंक चार, अंक चार, अंक चार.. कवी :- सुमित अतकुलवार
Various aspects of human relationships and modern technology [ # marathi article]
MARATHI POEM 2
शब्द हेच खरे किमयागार शब्दच करतात प्रहार आणि शब्दच करतात प्रतिकार शब्दच आहे जीवनाचे खरे शिल्पकार शब्दाविना हे जग निराकार म्हणून शब्द हेच खरे किमायागार शब्द हेच मित्र शब्द हेच शत्रू शब्दांनीच होतो संवाद आणि शब्दांनीच होतो विवाद म्हणून शब्द हेच खरे किमयागार शब्द हीच तलवार आणि शब्द हीच आहे ढाल शब्दांनीच पेटतात माणसे, घरदार आणि समाज शब्दांनीच विजेते माणसांच्या मनांतील आग म्हणून शब्द हेच खरे किमयागार शब्द हेच यशाचे मूलमंत्र शब्द हेच अपयशाचे कारण शब्द ठरतात आयुष्याचे मार्गदर्शक आणि शब्दच ठरतात फसवे वाटाडे शब्द हेच खरे किमयागार शब्दांमुळेच आहे माणसाच्या जीवनाला खरा अर्थ शब्दांन अभावी त्याच जीवन आहे व्यर्थ म्हणून शब्द हेच खरे किमयागार @ सुमित संजय अतकुलवार
Super काव्य गुरुजी
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteछान प्रयत्न आहे सर.अभिनंदन
DeleteThank you
DeleteThank you
ReplyDeletekhup chan vichar mandle
ReplyDeleteअप्रतिम कविता
ReplyDeleteSundarr sumit 👏👏👍
ReplyDelete